रत्नागिरी : गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर याबाबतचे कायदे त्वरित व्हावेत, यासाठी रत्नागिरीत हिंदू गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवारी (दि. १५ एप्रिल) सायंकाळी ४ वाजता हा मोर्चा श्री शिवतीर्थ मारुतीमंदिर येथून सुरू होईल.
Author: Kokan Media
गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३मध्ये केवळ १२ ते १५ टक्के आंबा उत्पादन; राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी : उदय सामंत
रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.
विश्व मराठी परिषदेतर्फे वेरवलीत साहित्य संस्कृती जागर शिबिर
रत्नागिरी : पुण्यातील विश्व मराठी परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात वेरवली (ता. लांजा) येथे अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या सहयोगाने साहित्य संस्कृती जागर शिबिर आयोजित करण्यात आले आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी हे शिबिर २२ मे ते २६ मे या काळात होणार आहे.
रत्नागिरीत १२ एप्रिलला सायंकाळी सावरकर गौरव यात्रा
रत्नागिरी शहरामध्ये बुधवारी, १२ एप्रिल २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वतः केलेला अभ्यासच विद्यार्थ्याला वाचवू शकेल : जगदीश पवार
राजापूर : स्वतः केलेला अभ्यासच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याला वाचवू शकेल, असा विचार सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनिअर आणि माय राजापूर संस्थेचे अध्यक्ष जगदीश पवार यांनी मांडला.
… त्याला अंधारात माझे बाबा दिसतायत!
देवरूख (संगमेश्वर) येथील हरहुन्नरी पत्रकार संदेश सुरेश सप्रे यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्याविषयी ज्येष्ठ बंधूने व्यक्त केलेल्या भावना.