रत्नागिरी : सोशल मीडियाद्वारे राज्यभरातील विविध प्रांतांतून एकत्र आलेल्या ‘कानसेनां’नी सलग चार वर्षे रत्नागिरीत प्रत्यक्ष स्नेहसंमेलन साजरे केले; मात्र या वर्षीच्या अभूतपूर्व परिस्थितीत प्रत्यक्ष संमेलन घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे संमेलन आयोजित करण्यात आले आणि ते यशस्वीपणे साजरे झाले. संमेलनाला यंदा व्यापक स्वरूप मिळाले. सलग दहा दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.
