रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्राजक्ता काकतकर (ठाणे), तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. ज्येष्ठ गायिका विदुषी आशाताई खाडिलकर यांनी अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
