राजापूर : विधवांना समाजात चांगले स्थान देण्याची चळवळ सुरू झाली आहे. विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ठिकठिकाणच्या ग्रामपंचायती ठराव करत आहेत. त्यातील एक पुढचे पाऊल राजापूर तालुक्यातील एका शिक्षकाने उचलले आहे. स्वतःच्याच हयातीत आपल्या पत्नीला वैधव्यप्रथेतून मुक्त करण्याचे प्रतिज्ञापत्र या शिक्षकाने केले आहे.
