राजापूर : लहान मुलांना सांगितली जाणारी कावळ्याच्या युक्तीची गोष्ट सगळ्यांनाच माहीत असेल. तहान लागलेल्या कावळ्याला पाण्याने अर्धे भरलेले मडके दिसते. तो मडक्याच्या काठावर उभा राहून पाणी पिण्याचा प्रयत्न करतो. पण मडक्यातल्या पाण्यापर्यंत त्याची चोच पोहोचत नाही. तेव्हा तो आजूबाजूचे खडे मडक्यात टाकतो. पाणी वर येते. पाणी पिऊन तो तहान भागवून निघून जातो. या गोष्टीतील कावळ्याची युक्ती वापरून राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या एका रानगव्याची सुटका ग्रामस्थांनी केली.
