रायगडावरच्या दीडशे वर्षांनंतर भरलेल्या हत्ती तलावाचे संभाजीराजांनी केले पूजन

शिवरायांची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव १५० वर्षांनंतर काठोकाठ भरला आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तलावाला १८ जुलै २०२० रोजी भेट देऊन तलावातील पाण्याचे पूजन केले आणि ओंजळीने तलावाचे पाणी पिऊन तृप्तता अनुभवली.

Continue reading

‘निसर्ग’मुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान; ‘जीआय’ १० वर्षे लांबणार

रत्नागिरी : गेल्या तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुपारीची लागवडच उद्ध्वस्त झाल्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपारीच्या श्रीवर्धनी प्रजातीला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळवून देण्याची प्रक्रिया तर तब्बल दहा वर्षे लांबणार आहे. त्यामुळे विद्यापीठाबरोबरच बागायतदारांचेही नुकसान होणार आहे.

Continue reading

वादळानंतर अद्यापही सरकारकडून कोकणाला पुरेशी मदत नाही : फडणवीस यांची टीका

रत्नागिरी : ‘कोकणातील चक्रीवादळानंतरची परिस्थिती पाहून शासनाने मदत केल्याचे दिसत नाही. शासनाचे अस्तित्वच दिसत नाही,’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांनी आज (१२ जून) रत्नागिरी जिल्ह्यातील चक्रीवादळाने नुकसान झालेल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा दौरा केला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Continue reading

चक्रीवादळामुळे रायगडात काही लाख घरांचे नुकसान; रत्नागिरीत तीन हजार झाडे जमीनदोस्त

रत्नागिरी/मुंबई : तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले आहे. एक लाखाहून जास्त झाडे पडली आहेत. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली आणि मंडणगडमध्ये जास्त नुकसान झाले आहे. तेथे तीन हजार झाडे आणि विजेचे एक हजार ९६२ खांब मोडून पडले आहेत. रत्नागिरीत महावितरणची १४ उपकेंद्रे कालच्या वादळात नादुरुस्त झाली असून, ती दुरुस्त करण्याचे काम सुरू झाले आहे.

Continue reading

चक्रीवादळ अखेर मंदावले; अचूक अंदाज, योग्य नियोजनामुळे जीवितहानी टळली

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी/अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या किनाऱ्यावर ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने धडकलेले निसर्ग चक्रीवादळ अखेर मंदावले आहे. या वादळामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मालमत्तेचे

Continue reading

चक्रीवादळ अलिबागजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू; वाऱ्यांचा वेग १०० किमीहून अधिक

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाने तीन जूनला दुपारी एक वाजता जाहीर केलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची (लँडफॉल) प्रक्रिया दुपारी साडेबारापासून सुरू झाली आहे. पुढील तीन तासांत ती प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या चक्रीवादळाच्या व्यासाचे ईशान्येकडील टोक जमिनीवर पोहोचले आहे.

Continue reading

1 2