मोफत एसटी प्रवासाबाबत परिवहन मंत्री म्हणजेच सरकार लोकांची दिशाभूल करत आहे!

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मोफत एसटी प्रवासाबाबत परिवहन मंत्री म्हणजेच सरकार लोकांची दिशाभूल करत आहे!
अडकून राहिलेल्या लोकांना गावोगावी पाठवण्यासाठी आज (आठ मे २०२०) एसटी महामंडळामार्फत ज्या गाड्या सोडण्यात आल्या, त्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून नेहमीच्या भाड्याच्या चौपट भाडे आकारले गेले. त्यामुळे रेल्वेच्या निमित्ताने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या आणि राज्य सरकारचा भाग असलेल्या काँग्रेसने संवेदनशीलतेचे वेगळेच दर्शन घडवले आहे. जागतिक संकटात राजकारण नको, असे म्हणत सारेच पक्ष राजकारणाचे चांगलेच दर्शन कसे घडवत आहेत, याचा हा नमुना आहे. कोणालाही करोनाच्या संकटात सापडलेल्यांबद्दल यत्किंचितही कणव नाही किंवा जाणीवही नाही, हे त्यातून स्पष्ट होते.