आचरे गावातली रामनवमी… ‘पुलं’, कुमार गंधर्वांच्या सहभागाने पुलकित झालेली..

आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर मंदिरातील १९७५ सालचा रामनवमी उत्सव काही औरच होता. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, कुमार गंधर्व यांच्यासह महाराष्ट्रातील ख्यातकीर्त ७० कलावंतांच्या सहभागामुळे तो त्रिशतसांवत्सरिक उत्सव अविस्मरणीय झाला. त्या उत्सवाच्या आठवणींबद्दल आचऱ्यातील ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…

Continue reading

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा १०७ वा चैत्रोत्सव शुक्रवारपासून

लांजा : मठ (ता. लांजा) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा १०७ वा चैत्रोत्सव येत्या शुक्रवारपासून (दि. ३१ मार्च) सुरू होत आहे. यावर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा मिरज येथील ड़ॉ. भास्कर प्राणी आणि कुटुंबीय करणार आहेत.

Continue reading

कीर्तनसंध्या परिवारातर्फे ई-चाचणी प्रश्नमंजूषा

रत्नागिरी : येत्या ३० मार्च रोजी (चैत्र शुक्ल नवमी) म्हणजेच रामनवमी असून त्याचे औचित्य साधून रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवारातर्फे श्रीरामाच्या जीवनावर आधारित ई-चाचणी प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली आहे.

Continue reading

काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

Continue reading

‘लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा अनमोल ठेवा जपायला हवा’

चिपळूण : ‘स्त्री गीते हे उपमांचे भांडार आहे; विधी, श्रम अणि खेळ या अनुषंगाने स्त्री गीतांमध्ये नृत्यही येते. ही गीते इतिहास, समाज, नाती-गोती याची महती सांगणारी असून, लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा हा अनमोल ठेवा जपायला हवा,’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ या परिसंवादातून उमटला.

Continue reading

संपूर्ण कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण आवश्यक : माधव भांडारी

चिपळूण : मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर डहाणूपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.

Continue reading

1 2 3 55