रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास उत्साहाने प्रारंभ करण्यात आला. खेडशी (ता. रत्नागिरी) येथे १७ मार्च २०२३ रोजी पथनाट्याद्वारे जागर करण्यात आला.
ग्रंथालयसेवेचा रौप्यमहोत्सव
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातील कारकिर्दीच्या २५ वर्षांच्या वाटचालीविषयी अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केलेले विचार.
जळगाव-शिर्डी-मडगाव रेल्वेसेवेची मागणी
रत्नागिरी : शेगाव येथील राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले यांनी संघटनेच्या वतीने जळगाव साईनगर शिर्डी मडगाव गोवा रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
फोटोग्राफर असोसिएशनतर्फे वेडिंग फोटोग्राफीविषयी कार्यशाळा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वेडिंग फोटोग्राफी या विषयावर खेड आणि लांजा येथे मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
बिनकामाचे वेतन कशासाठी?
राज्यातील दोन टक्के कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. निवृत्तीनंतरचे भरभक्कम वेतन हा त्यांना त्यांचा हक्क वाटतो. पण कोणतीही शाश्वती नसलेले, तुटपुंज्या वेतनात काम करणारे कर्मचारी, मानधनावर काम करणारे कर्मचारी, मोलमजुरीवर जगणारे मजूर आणि यापैकी काहीही मिळत नसलेले कोट्यवधी बेरोजगार महाराष्ट्रात आहेत. काहीही काम न करता शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यापेक्षा तेच वेतन या बेरोजगारांना, तुटपुंजे वेतन, मानधन घेणाऱ्यांना दिले, तर त्यांना कितीतरी मदत होणार आहे.
वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही
वसई : वसई-सावंतवाडी पॅसेंजरबाबत कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्रही झाली आहे. संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा आग्रह व्यक्त झाला.