रत्नागिरीची रुग्णसंख्या १८३वर; नवे आठ करोनाबाधित सापडले

रत्नागिरी : काल रात्री (२६ मे) उशिरा आलेल्या अहवालांनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आणखी आठ करोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १८३वर पोहोचली आहे. या आठपैकी सहा जण रत्नागिरीतील, तर दोन जण संगमेश्वरातील आहेत. रत्नागिरीतील सहा जणांपैकी चार जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल आहेत.

Continue reading

पावसाचे पाणी साठवण्याच्या किफायतशीर तंत्रांची माहिती ‘ई-बुक्स’मध्ये; पाणीवाले परांजपे यांचे लेखन

कोकणात प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचे पाणी काही प्रमाणात जरी साठवता आले, तरी कोकणातील काही गावांत मे महिन्याच्या अखेरीला जाणवत असलेली पाणीटंचाई दूर होऊ शकेल. याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उल्हास मुकुंद परांजपे गेली १२-१५ वर्षे झटत आहेत. स्थानिक उपलब्ध साधनांच्या साह्याने कमी खर्चात टिकाऊ अशा पाणीसाठवण टाक्यांच्या निर्मितीचे तंत्र त्यांनी अनुभवातून सिद्ध केले आहे. या तंत्रांची माहिती देणारी त्यांची पुस्तके आता ई-बुक स्वरूपात गुगल प्ले-बुक्सवर प्रकाशित झाली आहेत.

Continue reading

रत्नागिरीत नव्या १४ रुग्णांची वाढ; १२ जणांना घरी सोडले; एकाचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २६ मे) सायंकाळी करोनाबाधितांमध्ये १४ जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या १७५ वर पोहोचली आहे. दरम्यान आज १२ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

Continue reading

देवरूखच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले किफायतशीर, सुखकर फेस शील्ड

देवरूख : करोना संसर्गप्रतिबंधक फेस शील्ड तयार करून देवरूख आणि परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या सुटीचा सदुपयोग केला आहे. करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रचलित फेस शील्डमध्ये असलेले दोष दूर करून त्यांनी हे फेस शील्ड तयार केले आहे. शिवाय ते किफायतशीर किमतीत उपलब्ध करून दिले आहे.

Continue reading

रायपाटणच्या शेतकरी समूहाचा एक हजार डझन हापूस आंबा एसटीतून औरंगाबादला

राजापूर : एसटीने आंब्याची वाहतूक सुरू केल्याचा फायदा रायपाटण (ता. राजापूर) येथील शेतकरी समूहाला झाला. मालवाहतुकीच्या एकाच ट्रकमधून साडेतीन टन म्हणजे एक हजार डझन हापूस आंबा सोमवारी (ता. २५ मे) थेट औरंगाबादला रवाना झाला.

Continue reading

रत्नागिरीत स्वॅब टेस्ट लॅब उभारण्याचा शासन निर्णय जारी; करोनाग्रस्तांमध्ये आज पाचने वाढ

रत्नागिरी : मिरज येथून आज (२५ मे) रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६१वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५५ रुग्णांना उपचारांनंतर पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करायला मान्यता देणारा शासन निर्णय राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आज (२५ मे) जारी केला.

Continue reading

1 629 630 631 632 633 654