रत्नागिरी : आज १ जून २०२० पासून येत्या ४ जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर निसर्ग नावाचे चक्रीवादळ येत असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
