सर्वसामान्यांना आरोग्यसुविधा देण्यावर शासनाचा भर : मुख्यमंत्री

रत्नागिरी : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी शासन पावले उचलत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Continue reading

सातत्याचे दुर्लक्ष हेच कारण

मुंबई-गोवा महामार्गावरचा सर्वांत लांबीचा पूल उभारतानाच कोसळल्यामुळे महामार्गाच्या सुरक्षिततेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. औपचारिकतेपलीकडे जाऊन त्याचा विचार करायला हवा. रस्त्यामधल्या खड्ड्यांपेक्षा विकासकामे किती उभी केली आहेत, त्याकडे लक्ष द्यावे, असे पालकमंत्र्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याची आठवण यानिमित्ताने झाली. पण रस्त्यांमधील खड्डे आणि कोसळणारे पूल यातून जीव वाचला, तरच त्या विकासाची फळे चाखता येणार आहेत, हेही लक्षात ठेवायला हवे.

Continue reading

अखेर न्याय मंडणगडच्या दारी; तालुक्याला ६३ वर्षांनी मिळाले दिवाणी व फौजदारी न्यायालय

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याची निर्मिती १९६० साली झाली. त्यानंतर ६३ वर्षांनी तालुक्यात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय सुरू झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज (८ ऑक्टोबर २०२३) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचे उद्घाटन मंडणगडमध्ये झाले.

Continue reading

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिक ५० विद्यार्थी असावेत – उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अनिश्चितता संपली आहे. येत्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२९ ऑक्टोबर) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

रत्नागिरी : रत्नागिरीत आज ७७ व्या स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याच्या मुख्य समारंभात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

Continue reading

पाण्याखाली गेलेल्या चांदेराईतल्या ७७ दुकानांना प्रत्येकी ५० हजारांची मदत पालकमंत्र्यांकडून जाहीर

काजळी नदीचे पाणी वाढल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठ दोन दिवस पाण्याखाली होती. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी (२९ जुलै) चांदेराईला भेट दिली आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तिथल्या ७७ दुकानदारांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तर टपरीधारकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Continue reading

1 2 3 4 15