तौते चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटींची नुकसानभरपाई

रत्नागिरी : अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीसाठी कोकणवासीयांना प्राथमिक टप्प्यात २५२ कोटींची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांचे गृह विलगीकरण बंद, टाळेबंदीत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी ब्रेक दे चेनअंतर्गत लागू केलेली टाळेबंदी येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहे.

Continue reading

करोनाबाधितांच्या शोधासाठी आता भिस्त फॅमिली डॉक्टरवर

रत्नागिरी : ग्रामीण भागात पसरत चाललेल्या करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातील फॅमिली डॉक्टरांची राज्य टास्क फोर्स थेट संपर्क साधणार आहे. देशभरातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी – जिल्हाधिकारी

रत्नागिरी : करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आज रात्रीपासून राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Continue reading

`ब्रेक दि चेन’ अंतर्गत संचारबंदीमध्ये काय सुरू असेल? काय बंद असेल?

मुंबई : राज्यात आज, (१४ एप्रिल) रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत काय सुरू राहील आणि काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती राज्य शासनाच्या नियमावलीत देण्यात आली आहे.

Continue reading

राज्यात १४ एप्रिलपासून १ मेपर्यंत कडक संचारबंदी

मुंबई : करोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. १३) रात्री केली. उद्या, बुधवार, १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून १ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

Continue reading

1 2 3 4 5 7