मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबई आणि पुण्यातून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एसटीप्रेमी महासमूहातर्फे करण्यात आले आहे.
Tag: एसटी बस
चाकरमान्यांना सवलतीत एसटी उपलब्ध करून द्यावी : आमदार राजू पाटील यांची मागणी
कल्याण : गणेशोत्सवाकरिता मुंबई आणि परिसरातून कोकणासह राज्यभरात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना सवलतीच्या दरात एसटीची बससेवा उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांनी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना कोकणवासीयांच्या वतीने दिले आहे.
२२ मेपासून रत्नागिरी जिल्ह्यात ५२ एसटी धावणार; रेल्वे आरक्षणही सुरू
रत्नागिरी : करोनामुळे लागू असलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये २२ मेपासून शिथिलता जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील ३२ मार्गांवर ५२ गाड्या २२ मेपासून धावणार आहेत. एसटीच्या विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली. प्रवाशांच्या मागणीनुसार या गाड्या धावणार आहेत.
मोफत एसटी प्रवासाबाबत दिशाभूल सुरूच…
मोफत एसटी प्रवासाबाबत परिवहन मंत्री म्हणजेच सरकार लोकांची दिशाभूल करत आहे!
रेल्वे फुकट पाहिजे; एसटी मात्र चौपट भाडे आकारणार
अडकून राहिलेल्या लोकांना गावोगावी पाठवण्यासाठी आज (आठ मे २०२०) एसटी महामंडळामार्फत ज्या गाड्या सोडण्यात आल्या, त्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून नेहमीच्या भाड्याच्या चौपट भाडे आकारले गेले. त्यामुळे रेल्वेच्या निमित्ताने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या आणि राज्य सरकारचा भाग असलेल्या काँग्रेसने संवेदनशीलतेचे वेगळेच दर्शन घडवले आहे. जागतिक संकटात राजकारण नको, असे म्हणत सारेच पक्ष राजकारणाचे चांगलेच दर्शन कसे घडवत आहेत, याचा हा नमुना आहे. कोणालाही करोनाच्या संकटात सापडलेल्यांबद्दल यत्किंचितही कणव नाही किंवा जाणीवही नाही, हे त्यातून स्पष्ट होते.