मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता वस्त्रसंहिता अमलात येणार आहे, ही फारच चांगली बाब आहे. सर्वच मंदिरांमध्ये ती व्हायला हवी आहे. पण वस्त्रसंहिता जारी करतानाच मंदिराच्या व्यवस्थापनाच्या बाजूने असलेली आचारसंहिताही तेवढीच महत्त्वाची आहे. मंदिरांचे पावित्र्य भाविकांनी जपले पाहिजे, हे जितके खरे आहे, तितकेच मंदिराचे व्यवस्थापन आणि प्रामुख्याने पुजारी यांनीही आचारसंहिता पाळली पाहिजे.
