गणेशोत्सवासाठी रत्नागिरीतून सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह

रत्नागिरी : करोनाप्रतिबंधाचा उद्देश कायम ठेवून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आठ ते १५ दिवसांच्या वास्तव्याबाबत शासनाने स्पष्ट निर्णय घेण्याची आणि नियोजन करण्याची चाकरमान्यांनी मागणी केल्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली; मात्र चाकरमान्यांचे विलगीकरण १४ दिवसांचे होणार की सात दिवसांचे, संस्थात्मक की गृह विलगीकरण याबाबत अद्यापही शासन आणि प्रशासनाने काहीही स्पष्ट केलेले नाही. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग या आपल्या मूळ जिल्ह्यात उत्सवासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांबाबतचा कोणताच विषय पुढे आलेला नाही.

Continue reading

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात वीस खाटांचं क्वारंटाइन सेंटर

रत्नागिरी : कोकण रेल्वेने रत्नागिरी स्थानकात वीस खाटांचे क्वारंटाइन सेंटर उभारले आहे. काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेतील एका कर्मचाऱ्याचा करोनाच्या बाधेने मृत्यू झाला होता. त्यानंतर कोकण

Continue reading

कोकण रेल्वेचे कर्मचारी करोना प्रतिबंधक विलगीकरणामध्ये

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या बेलापूर या मुख्य कार्यालयातील सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या रोहा, कोलाड आणि रत्नागिरीतील सुमारे तीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Continue reading

सावंतवाडी तालुक्यात क्वारंटाइन तरुणाचा मृत्यू; कारण अस्पष्ट

सावंतवाडी : क्वारंटाइन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वारंटाइन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Continue reading

आठ मार्चनंतर पुण्या-मुंबईतून रत्नागिरीत आलेल्यांनी सक्तीने घरीच राहावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रत्नागिरी : मुंबई व पुणे शहरातून आठ मार्च २०२०नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडू नये, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Continue reading