डॉ. जयंत नारळीकर यांनी साहित्य संमेलनाध्यक्ष पदावरून केलेले भाषण

९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत होत आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्या रूपाने यंदा प्रथमच एक वैज्ञानिक साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले; मात्र प्रकृती अस्वास्थामुळे डॉ. नारळीकर या संमेलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप तीन डिसेंबर रोजी संमेलनस्थळी प्रसारित करण्यात आली. त्यांचे हे भाषण आपल्याला येथे वाचता येईल. भाषणाच्या शेवटी दिलेल्या लिंकवरून आपण हे भाषण डॉ. नारळीकर यांच्याच आवाजात ऐकूही शकता.

Continue reading

मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. आज (११ जानेवारी २०२१) नाशिकमध्ये प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष वास्तुविशारद संजय पाटील स्मारक समितीचे अॅड. विलास लोणारी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

Continue reading