आंबडवे गावाचे आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल; ‘डिक्की’चा पुढाकार

आंबडवे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) या गावाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. येत्या तीन महिन्यांत त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि उद्योग-व्यवसायांतून हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील, असा विश्वास ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी आज (१८ सप्टेंबर) आंबडवे येथे व्यक्त केला.

Continue reading

मदत वाटपाच्या समन्वयासाठी स्वयंसेवक हवेत

नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रामुख्याने घरे अंशतः बाधित झालेल्यांसाठी निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. शासनाच्या

Continue reading

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नव्या निकषांनुसार अधिक भरपाई : उदय सामंत

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई दिली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील आपद्ग्रस्तांना त्याचा फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (२४ जून) दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) मुंबईतून घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. खासकरून अंशतः बाधितांच्या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याने भरपाईपासून वंचित राहणाऱ्या हजारो आपद्ग्रस्तांना भरपाई मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Continue reading

महामानवाच्या आंबडवे गावातील प्रत्येक कुटुंब होणार आत्मनिर्भर

निसर्ग चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या आंबडवे गावातील नागरिकांना पुन्हा नव्याने स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ (डिक्की), खादी ग्रामोद्योग मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ (बाटू) या संस्था एकत्र आल्या आहेत. हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा ‘डिक्की’चे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे यांनी काल (१८ जून) आंबडवे येथे केली. प्रत्येक घरातल्या प्रत्येक हाताला उद्योग, त्यासाठीचा कच्चा माल, निर्मितीचे प्रशिक्षण आणि पक्का माल खरेदीची हमी अशी सर्वांगीण योजना त्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Continue reading

कोकणाला पुन्हा वैभवाचे दिवस आणू – प्रवीण दरेकर

मुंबई : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छीमार उद्ध्वस्त झाले आहेत. आता पुन्हा कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या दौ-यात कोकणाचे जे विदारक चित्र पाहिले, ते बदलायचे आहे, कोकणवासीयांना तात्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून आपण सारे मिळून कोकणाला पूर्वस्थितीत आणू, कोकणाला वैभवाचे दिवस पुन्हा आणू, असा ठाम विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी १६ जूनला व्यक्त केला.

Continue reading

दलित इंडियन चेंबर करणार आंबडवे गावाचे पुनर्वसन

रत्नागिरी : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) या संस्थेने आंबडवे (ता. मंडणगड) या बाबासाहेब आंबेडकरांच्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी संस्थेचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे गुरुवारी (ता. १८) स्वतः गावाला भेट देणार आहेत.

Continue reading

1 2 3 4