ऋषीपंचमीला कंदमुळाची भाजी केली जाते. पूर्वीच्या काळी जंगलात वास्तव्याला असलेल्या ऋषी-मुनींच्या आहारात प्रामुख्याने कंदमुळेच असत. ऋषीपंचमीला केल्या जाणाऱ्या भाजीमागची मूळ संकल्पना तीच आहे. ऋषीपंचमीच्या या भाजीत उपलब्धतेनुसार विविध कंदमूळवर्गीय भाज्या, रानातल्या पालेभाज्या, फळभाज्या आदींचा समावेश असतो. अशा वैविध्यपूर्ण भाज्यांमुळे कंदमुळाच्या या भाजीची चव आणि पौष्टिकता या दोन्ही गोष्टी अप्रतिम असतात.
