रत्नागिरी : जिल्ह्यासह रत्नागिरी तालुक्यात करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या अनुषंगाने जनता कर्फ्यू सुरू करण्याचा प्रयत्न रत्नागिरी व्यापारी संघटनेने केला; मात्र त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे बाजारपेठ सुरूच राहणार आहे.
