पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पोंभुर्ले (ता. देवगड) : यावर्षीचा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.
देवगड : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७७ व्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी पोंभुर्ले (ता. देवगड) येथे येत्या १७ मे रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातील पोंभुर्ले (देवगड) या गावचे. त्यांचा जन्म आणि मृत्यूही याच गावात झाला. सहा जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘दी बॉम्बे दर्पण’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणून बाळशास्त्रींना मराठीतील आद्य पत्रकार मानले जाते आणि सहा जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. (सहा जानेवारीला बाळशास्त्रींची जयंती नसते.) ‘दर्पण’ सुरू करताना त्यांची नेमकी भूमिका काय होती, त्याबद्दल त्यांनी पहिल्या अंकात लिहिले होते. ते त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दांत येथे प्रसिद्ध करत आहोत.
अलीकडे नेत्यांना आपल्यावर झालेली टीका अजिबात सहन होईनाशी झाली आहे. देशातील अनेक राज्यांसह मुंबईतील काही पत्रकारांना याचा त्रास भोगावा लागला आहे. आता ते लोण रत्नागिरी जिल्ह्यातही येऊन ठेपले आहे. काही प्रमाणात यूट्यूब चॅनेलमधून विरोधी पक्षाची भूमिका पत्रकार निभावत असतात. त्यांची संख्या अगदीच नगण्य असली, तरी ते अंधारातल्या पणतीचे काम करून समाजाला प्रकाश दाखविण्याचे काम करतात. त्यांचा आवाज क्षीण असला, तरी ते आपले काम नेटाने करत असतात. मात्र त्याचाही नेत्यांना त्रास होत असतो.
तंत्रज्ञानातील पत्रकारितेला आवश्यक मूलभूत सोयीसुविधांसाठी आर्थिक पाठबळ असावे लागते. त्यामुळे व्यावसायिकीकरणाला पर्याय नाही. परिणामी इष्ट तेच छापणार या बोधवाक्याशी फारकत घेऊन जे विकेल, तेच छापणार किंवा जे वाचले जाईल, तेच लिहिणार, प्रसारित करणार असे पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे.
रत्नागिरी : समाजप्रबोधन आणि विश्वासार्ह माहिती देण्याचे काम वृत्तपत्रे करत असून पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांनी आज केले.