कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहोचवू या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते.

Continue reading

वृत्तपत्रांनी लोकशिक्षणाचे काम व्रत म्हणून सुरू ठेवावे –  भगतसिंग कोश्यारी

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये वृत्तपत्रांचा खूप मोठा सहभाग आहे. अत्यंत खडतर काळापासून अत्याधुनिक सोयीसुविधांपर्यंत वृत्तपत्रांचे स्थित्यंतर झाले आहे आणि यापुढेही ते होत राहणार आहे. पण लोकशिक्षणाचे काम वृत्तपत्रांनी यापुढेही व्रत म्हणून केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

Continue reading

दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

रत्नागिरी : येथील दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भेट देऊन नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Continue reading

सावरकरांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेचे : राज्यपाल कोश्यारी

रत्नागिरी : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतातील जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे,’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (२५ ऑक्टोबर) केले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

Continue reading

अंतिम वर्षाची परीक्षाप्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया येत्या ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली आज (तीन सप्टेंबर) मुंबईत राजभवनात झालेल्या सर्व कुलगुरूंच्या बैठकीतील निर्णयाची माहिती त्यांनी दिली.

Continue reading

राजभवन देवी मंदिरात राज्यपालांनी केली आरती

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (सात जुलै) राजभवन येथील प्राचीन देवी मंदिरात जाऊन देवीची आरती केली.

Continue reading