रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या जुलैच्या अखेरच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण आणि खेड तालुक्यात आलेल्या महापुरानंतर मोठ्या प्रमाणावर बचाव आणि स्वच्छता करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. आतापर्यंत एकूण १ कोटी ७८ लाख ३६ हजार ८०० रुपयांच्या मदतवाटपाचे काम प्रशासनाने केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
