मुंबई : महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उद्योगांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रलंबित अनुदान राज्य सरकारने तत्काळ वितरित करावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. श्री. सामंत यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
