नवी मुंबई : मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा. महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे, असे उद्गार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांनी काढले.
