संपूर्ण कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण आवश्यक : माधव भांडारी

चिपळूण : मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर डहाणूपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.

Continue reading

सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद जगवला पाहिजे : डॉ. अशोकराव मोडक

रत्नागिरी : कम्युनिस्ट, डाव्यांच्या रशियाला अजूनही युक्रेनवर निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही देशांचे मूळ एकच आहे. परंतु परकीय निष्ठा सांगणाऱ्या कम्युनिस्ट राष्ट्रवादाचा पराभव होत आहे. त्याच वेळी वीर सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद आजच्या काळात महत्त्वाचा आहे. तो आपण साऱ्यांनी जगवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी लिहिलेल्या ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यावर ते बोलत होते.

Continue reading

प्रदेश भाजपाच्या निबंध स्पर्धेत नाशिकचे वैभव अलई विजेते

मुंबई : भारतीय जनता पार्टी प्रदेश माध्यम विभागातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत नाशिक येथील वैभव अलई यांचा निबंध सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

Continue reading

अन्याय झालेल्या चक्रीवादळग्रस्तांसाठी भाजपचा ‘द फिफ्थ पिलर’

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळात अनेकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना भरपाई मिळण्याची शक्यता नाही. हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन ‘द फिफ्थ पिलर’ नावाची संकल्पना राबविली आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नुकसान झालेल्या कोणाही बागायतदाराला, मत्स्य व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या नुकसानीविषयीची छायाचित्रे आणि व्हिडीओ सादर करता येऊ शकतील.

Continue reading

चक्रीवादळाचे नुकसान १०० कोटीचे, सरकार दाखवते ८-१० कोटी!

रत्नागिरी : कोकणात नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळाने किमान १०० कोटीचे नुकसान झाले आहे. सरकार मात्र ८ ते १० कोटीचे नुकसान दाखवून फसवणूक करत आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली.

Continue reading

केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब : माधव भांडारी

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात, गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज, सोमवारी, १५ फेब्रुवारी रोजी येथे पत्रकार परिषदेत केले.

Continue reading