नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात तापमानाने नवे उच्चांक गाठलेले असताना सर्वांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची. आणि तो अखेर अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच १६ मे २०२२ रोजी नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात येऊन दाखल झाले आहेत. २७ मे रोजी मान्सून केरळला थडकणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
