खूशखबर! मान्सून अंदमानात दाखल; २७ मे रोजी केरळमध्ये येणार!

नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात तापमानाने नवे उच्चांक गाठलेले असताना सर्वांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची. आणि तो अखेर अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच १६ मे २०२२ रोजी नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानच्या समुद्रात येऊन दाखल झाले आहेत. २७ मे रोजी मान्सून केरळला थडकणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

Continue reading

रत्नागिरीत १८ दिवसांत वार्षिक सरासरीच्या १८ टक्क्यांहून अधिक पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या १८ टक्क्यांहून अधिक पाऊस अवघ्या १८ दिवसांत पडला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११२.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १९० मिमी पावसाची नोंद राजापूर तालुक्यात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला सरासरी ३३५५ मिमी पाऊस पडतो. एक जून ते १८ जून २०२० या कालावधीत १८.४२ टक्के पाऊस झाला आहे.

Continue reading