रत्नागिरी : काल (तीन ऑगस्ट) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून, काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड, चिपळूण आणि राजापूर शहरांना पुराचा वेढा बसला आहे.
