रत्नागिरीतील शास्त्रज्ञाचे हिंदी पुस्तक करणार देशभरातील मत्स्य उत्पादकांना मार्गदर्शन

रत्नागिरीतील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय जोशी यांनी आतापर्यंत असंख्य मत्स्योत्पादकांना मार्गदर्शन केले असून, त्यासाठी पुस्तकेही लिहिली आहेत. आता त्यांनी ‘मीठे जल में मछलीपालन’ हे समग्र माहिती देणारे हिंदी पुस्तक लिहिले असून, त्याचा उपयोग देशभरातील मत्स्योत्पादकांना होणार आहे.

Continue reading

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३मध्ये केवळ १२ ते १५ टक्के आंबा उत्पादन; राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी : उदय सामंत

रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.

Continue reading

एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्पातील रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या कार्यालयाचे कोतवड्यात उद्घाटन

कोतवडे (ता. जि. रत्नागिरी) येथे जिल्ह्यातील पहिल्या एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्प (Integrated Farming Cluster) कार्यालयाचे उद्घाटन १९ जुलै २०२२ रोजी झाले.

Continue reading

‘टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी हवी; पण शेतकरीहितासाठी सध्याचे नियम जाचक’

वाइन उत्पादनाचे नियम आणि निकष केवळ बड्या उद्योजकांना अनुकूल ठरतील असेच आहेत. केवळ द्राक्षांपासूनच नव्हे, तर अनेक फळांपासून वाइन करता येते. वाइननिर्मितीची ही प्रक्रिया कोणताही छोटा शेतकरी किंवा उत्पादक घरच्या घरी करू शकतो; मात्र सरकारचे सध्याचे नियम त्याला तशी परवानगी देत नाहीत, असा दावा या विषयात अनेक यशस्वी प्रयोग केलेले दापोलीतील उद्योजक माधव महाजन यांनी केला आहे. वाइन म्हणजे दारू नव्हे, तर ते पोषणमूल्य असलेले पेय असल्याने अगदी चहा टपरीवरसुद्धा वाइनविक्रीची परवानगी मिळायला हवी, असेही त्यांचे म्हणणे आहे.

Continue reading

मंडणगड पंचायत समितीचा पाच एकर हळद लागवडीचा पथदर्शक प्रकल्प

पाच एकर क्षेत्रावर ४० हजार हळद रोपांची लागवड करण्याचा नावीन्यपूर्ण पथदर्शक प्रकल्प आकाराला येत आहे. इतर तालुक्यांसाठीही तो आदर्शवत आहे.

Continue reading

पालघरच्या किनारपट्टीवर कलहंसाचा मुक्त विहार

पालघर (नीता चौरे) : वातावरणातील वेगाने होणारे बदल आणि कमीजास्त प्रमाणात पडणारी थंडी अशी स्थिती असूनही पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर अनेक परदेशी पक्षी वास्तव्याला आले आहेत. त्यापैकी कलहंस नावाच्या पक्ष्याचा विहार पाहायला अनेक पक्षीप्रेमी आणि पर्यटक पालघरच्या किनारपट्टीवर येऊ लागले आहेत.

Continue reading

1 2 3