रत्नागिरी : धर्म (सार्वत्रिक कायदा) ही संकल्पना भारतीय विचार, संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे. समाज भारतीय परंपरेने धर्माला मूलभूत वर्गीकरण मानले आहे. आध्यात्मिक मुक्ती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे अत्यावश्यक आहे. विविध ग्रंथ, ठिकाणे आणि अर्थाची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत, असे प्रतिपादन संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठानच्या संचालिका डॉ. कला आचार्य यांनी केले.
