‘पितृपंधरवड्यात पितरांचे स्मरण केले जाते. त्या निमित्ताने दिविजा वृद्धाश्रमातील गरजू आजी-आजोबांना अन्नदान करून आपल्या पितरांचे स्मरण करावे. गरजवंतांना अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वेगळा पायंडा पाडावा,’ असे आवाहन असलदे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून करण्यात आले आहे.
