ग्रामपंचायतीच्या निवडणुका निकोप वातावरणात व्हाव्यात, गावात सर्वच लोक एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्यामध्ये पक्षीय वाद निर्माण होऊ नयेत, गावाच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. तसे संकेत आहेत. पण निवडून आल्यानंतर सर्वच पक्ष आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा करताना दिसतात. तसे होणार असेल, तर ते मूळ लोकशाही निकषांनाच बगल देणारे ठरते. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील उमेदवारांनाही यापुढे पक्षाची चिन्हेच द्यावीत, हे बरे.
Tag: काँग्रेस
रेल्वे फुकट पाहिजे; एसटी मात्र चौपट भाडे आकारणार
अडकून राहिलेल्या लोकांना गावोगावी पाठवण्यासाठी आज (आठ मे २०२०) एसटी महामंडळामार्फत ज्या गाड्या सोडण्यात आल्या, त्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून नेहमीच्या भाड्याच्या चौपट भाडे आकारले गेले. त्यामुळे रेल्वेच्या निमित्ताने केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या आणि राज्य सरकारचा भाग असलेल्या काँग्रेसने संवेदनशीलतेचे वेगळेच दर्शन घडवले आहे. जागतिक संकटात राजकारण नको, असे म्हणत सारेच पक्ष राजकारणाचे चांगलेच दर्शन कसे घडवत आहेत, याचा हा नमुना आहे. कोणालाही करोनाच्या संकटात सापडलेल्यांबद्दल यत्किंचितही कणव नाही किंवा जाणीवही नाही, हे त्यातून स्पष्ट होते.