जगातील आठवे आश्चर्य असलेल्या अंगकोरवाटमध्ये विष्णू भागवतकथा आणि धर्मयात्रा; अंगकोरवाट भारत फाउंडेशन संस्थेचा शुभारंभ

जगातील आठवे आश्चर्य आणि सर्वांत मोठे मंदिर असलेल्या कंबोडियातील अंगकोरवाट परिसरामध्ये नुकतेच विश्व मंदिर परिषदेद्वारा पहिल्यावहिल्या विष्णू भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीरामजन्मभूमी न्यास अयोध्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या अमृतमय वाणीने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

Continue reading

गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायण; १२५ जणांचा सहभाग

रत्नागिरी : गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीतील गीता भवनात आज (२२ डिसेंबर) सकाळी चार तास संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण करण्यात आले. या पारायणात १२५हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत भारती या सहा संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Continue reading

पर्यटकांसाठी स्व-संरक्षणाचे सूत्र

नजरेत न मावणाऱ्या अथांग सागराच्या किनाऱ्यावरचा अनुभव स्वतःला विसरायला लावणाराच असतो. त्यातही किनारपट्टीच्या प्रदेशात वास्तव्य नसलेल्यांना तर या अनुभवाचे विशेष अप्रूप असते; मात्र थोड्याशा निष्काळजीपणामुळेही हा अनुभव जीवनाची अखेर करू शकतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात असणे, धोक्याच्या सूचनांचे फलक लावणे, दुर्घटना घडल्यास वैद्यकीय सेवा आणि अँब्युलन्ससह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणे आदी बाबी अपरिहार्यच आहेत; मात्र पर्यटकांनी स्वतः सावध असणे हे त्याहून किती तरी महत्त्वाचे आहे.

Continue reading

गावखडी ते अक्कलकोट मनोरथपूर्ती पदयात्रा १३ डिसेंबरपासून

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडीपासून अक्कलकोटपर्यंतची मनोरथपूर्ती पदयात्रा दर वर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी, १३ डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात होणार आहे.

Continue reading

रत्नागिरीत रंगला १९वा छात्र-मित्र मेळावा; पहिला सर्वोदय पुरस्कार शिवराम जाधव यांना प्रदान

रत्नागिरी : ‘सर्वोदय छात्रालय अमृत महोत्सव साजरा करत आहे. छात्रालयाला शासकीय अनुदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भोजनाचा खर्च, दत्तक-पालक योजना, गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी विद्यासंकुल विकसित करण्याचा संकल्प केला आहे. याकरिता माजी विद्यार्थी आणि समाजातील जास्तीत जास्त दानशूरांनी मदत करावी,’ असे आवाहन यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान व्यवस्था समितीचे सदस्य हरिश्चंद्र गीते यांनी रविवारी (१० डिसेंबर) रत्नागिरीत केले.

Continue reading

महिला, युवक, शेतकरी आणि गरजूंचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याची पंतप्रधानांची ग्वाही

विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ डिसेंबर) देशभरातल्या विविध ठिकाणच्या नागरिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण देशभरात फिरणार आहे.

Continue reading

1 30 31 32 33 34 427