रत्नागिरीत आतापर्यंत १७ जण करोनामुक्त; आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, आज (१७ मे) नवे सहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता ९२वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील दोन रुग्णांना आज बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले.

Continue reading

कलमठमधील ‘नाडकर्ण्यांच्या वाड्या’चे वैभव अनुभवा ई-बुकमधून…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील कलमठ गावात ४० खोल्यांचा, दुमजली, चौसोपी, अवाढव्य असा नाडकर्ण्यांचा वाडा होता. भावी पिढीला नाडकर्ण्यांचे हे वैभव कळावे, त्यांना वाडा अनुभवता यावा म्हणून सौ. स्मिता (नाडकर्णी) अनगोळकर यांनी ‘नाडकर्ण्यांचा वाडा’ हे छोटे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी आणि त्याचे ई-बुक मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Continue reading

आढावा बैठका आणि दौरे आधी थांबवा

जे प्रतिनिधी सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार लोकांचे प्रबोधन करत आहेत, ते स्वतः मात्र हे सामाजिक अंतर राखताना दिसत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ठिकाणी, तसेच पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने आढावा बैठका घेत आहेत. आधुनिक संपर्क यंत्रणेच्या काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशा बैठका घेणे सहज शक्य असताना ते स्वतः दोन्ही जिल्ह्यांचा प्रवास नियमितपणे करत आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या किंवा जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या अधिकाऱ्यांना जेव्हा कारवाईचा इशारा दिला जातो, तेव्हा दोन जिल्हे सातत्याने फिरणाऱ्या मंत्र्यांचे वागणे योग्य म्हणता येणार नाही.

Continue reading

कोविड-१९च्या अनिवार्य ट्रेनिंगसाठी आयुष डॉक्टर्सना अपुरी मुदत अन्याय्य

मुंबई येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या संस्थेकडून आयुष डॉक्टरांसाठी कोविड-१९ संदर्भातील ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर्सनी ११ एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र तशी कल्पना त्यांना केवळ दोन दिवस आधी देण्यात आली आहे. खेड्यापाड्यांत काम करणाऱ्या डॉक्टर्सना कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न भेडसावतो. त्यातच प्रशिक्षण न घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Continue reading

वालावलची रामनवमी

या वर्षी करोना विषाणूच्या प्रभावामुळे आमच्या वालावल गावातील रामनवमीचा उत्सव हा सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रद्द करण्यात आला आहे. हा उत्सव रद्द करताना मनातील ज्या भावनेवर दगड ठेवला गेला तो गावातील प्रत्येकाला स्वीकारताना जड जात आहे. या उत्सवाची मजा काही औरच असते. ती ज्याने अनुभवली तो आज नक्की चुकचुकत असणार यात तिळमात्रदेखील शंका नाही.

Continue reading

1 199 200 201