उत्सवप्रेमापोटी उभारलेले श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर

सर्वसाधारणपणे आधी मंदिर उभारले जाते आणि तेथे नंतर उत्सव साजरा केला जातो; पण मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथे आधी उत्सव साजरा होऊ लागला आणि नंतर तेथे श्री लक्ष्मीपल्लीनाथाचे भव्य-दिव्य मंदिर उभारले गेले. यातून कोकणात उत्सवप्रियता किती आहे हे दिसून येते. ‘आधी कळस, मग पाया’ या अभंगाचेच जणू हे उदाहरण आहे.
साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात उमेश आंबर्डेकर यांनी लिहिलेल्या लेखाची ही एक छोटी झलक.