कोकणातील बागातदारांना यापुढे कृषी दराने वीज बिले

रत्नागिरी : कोकणातील आंबा, काजू, नारळ, चिकू बागायतदारांना आता कृषी दरानेच वीज बिले दिली जाणार आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे यासंदर्भात दिलेल्या प्रेझेंटेशनला यश आल्याची माहिती कोकण बिझिनेस फोरमचे संजय यादवराव यांनी दिली.