एक जून ते एक सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
एक जून ते एक सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार
रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी आज, ३१
ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
जिल्हा गुंतवणूक परिषदेत रत्नागिरी जिल्ह्यात २१५९ कोटी रुपयांच्या
गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये रत्नागिरीच्या पर्यटन वैभवात
भर घालणाऱ्या १०० कोटींच्या पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासह मोठ्या औद्योगिक
प्रकल्पांचा समावेश आहे.
खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक आणि
समाजसेवक अरुण कृष्णनाथ आठल्ये यांचे शनिवारी, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी
अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक
नितीन बगाटे यांची देशातल्या पहिल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली
आहे. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या रेड्स या कृत्रिम बुद्धिमत्ता
तंत्रज्ञानावर आधारित ॲपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रीय पोलीस अकादमीत करण्यात आलं.
सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात
पुढच्या महिन्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम
राबवली जाणार आहे. बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांचा सायबर विमा
उतरवावा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.