रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या दादागिरीवर कारवाईची मागणी

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील शेअरिंग रिक्षा स्टॉपवरून रिक्षाचालकांमध्ये वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. काही जुन्या रिक्षाचालकांकडून नवीन रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यास विरोध केला जात असून अरेरावी, शिवीगाळ व दादागिरी करून धमकावले जात आहे.

रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे उपपरिसरात रूपांतर व्हावे – कुलगुरू डॉ. अतुल वैद्य

रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.

सरकार आणणार नवा लँड टायटलिंग कायदा : महसूलमंत्री बावनकुळे यांची रत्नागिरीत घोषणा

जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ हे त्याचं तत्त्व असेल. तसंच, कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदाही लवकरच आणला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली.

संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचा रविवारी पाचवा वर्धापन दिन

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राचा पाचवा वर्धापन दिन आणि नूतनीकृत योगभवनाचे उद्घाटन रविवारी, दि. २ ऑगस्ट रोजी होणार आहे.

‘मातीचा जातीचा शेतकरी’ हे कोकणातील शेतीसमस्यांवर सकारात्मक मार्ग दाखवणारे पुस्तक; प्रकाशनप्रसंगी मान्यवरांचे प्रतिपादन

जांभूळआड (पूर्णगड) येथील प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांच्या ‘मातीचा जातीचा शेतकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी पावसमध्ये झाले.

रोटरी क्लब बुद्धिबळ स्पर्धेत वरद पेठे विजेता, साहस नारकरला उपविजेतेपद

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित जिल्हास्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीचा वरद पेठे विजेता ठरला, तर चिपळूणच्या साहस नारकरला उपविजेतेपद मिळाले.