देवरूखचा शिवकालीन इतिहास उलगडणारा नवा संदर्भ

देवरूख : धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करत असताना इतिहास ग्रंथांमध्ये नोंद असलेले १६६६ मधील ‘Battle of Devrukh’ हे देवरूखच्या शिवकालीन इतिहासाविषयीचे अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक प्रकरण संशोधकांच्या लक्षात आले आहे.

माझी कविता मालवणी मातीतच रुजलेली! – रुजारिओ पिंटो

मालवण : माझी मालवणी कविता मालवणी मातीतच रुजून आली. म्हणूनच तिच्यात मालवणी माणसांची सुखदुःखे, त्यांचा इरसालपणा दिसून येतो. दारिद्र्यातही विचारांची श्रीमंती देणारी माझी आई माझ्या प्रत्येक कवितेची मूलस्रोत आहे, असे उद्गार मालवणी ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो यांनी काढले.

रत्नागिरीत सलग एकविसाव्या वर्षी टिळक अभिवादन यात्रा

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे एकविसावे वर्ष होते.

आंबा पीक विमा हप्ता ५१०० रुपयांनी घटला; विमा कालावधीत १६ दिवसांची वाढ

जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरिता २०२६-२७च्या हंगामासाठी आंबा पिकाकरिता फळपीकविम्याचा हप्ता प्रति हेक्टर १३,६०० रुपयांऐवजी हेक्टरी ८५०० रुपये इतका करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जीवनाची ध्येये ठरवून केला त्यांच्या पूर्तीचा संकल्प; आगाशे विद्यामंदिरात तिसरीच्या विद्यार्थ्यांचा संकल्पदिन

उद्याचे जबाबदार नागरिक घडवायचे असतील, तर लहान वयातच त्यांना योग्य ध्येयांची दिशा मिळायला हवी. तसेच, त्या दिशेने जाण्याचा दृढ संकल्प केल्यास त्यांची वाटचाल सुकर होते. म्हणून संकल्पाचे महत्त्व मुलांच्या मनावर ठसण्याकरिता रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात दर वर्षीप्रमाणे यंदाही तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता १८ जुलै २०२६ रोजी संकल्पदिन साजरा करण्यात आला.

टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

रत्नागिरी : येथील १०१ वर्षांच्या टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे दि. ३१ जुलै ते १ व २ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत येथील वैद्य मंगल कार्यालयात दुसरी रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.