रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील शेअरिंग रिक्षा स्टॉपवरून रिक्षाचालकांमध्ये वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. काही जुन्या रिक्षाचालकांकडून नवीन रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यास विरोध केला जात असून अरेरावी, शिवीगाळ व दादागिरी करून धमकावले जात आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील शेअरिंग रिक्षा स्टॉपवरून रिक्षाचालकांमध्ये वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. काही जुन्या रिक्षाचालकांकडून नवीन रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यास विरोध केला जात असून अरेरावी, शिवीगाळ व दादागिरी करून धमकावले जात आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.
जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ हे त्याचं तत्त्व असेल. तसंच, कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदाही लवकरच आणला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली.
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या रामटेक (नागपूर) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राचा पाचवा वर्धापन दिन आणि नूतनीकृत योगभवनाचे उद्घाटन रविवारी, दि. २ ऑगस्ट रोजी होणार आहे.
जांभूळआड (पूर्णगड) येथील प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांच्या ‘मातीचा जातीचा शेतकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या दिवशी पावसमध्ये झाले.
रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित जिल्हास्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत रत्नागिरीचा वरद पेठे विजेता ठरला, तर चिपळूणच्या साहस नारकरला उपविजेतेपद मिळाले.