खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक आणि
समाजसेवक अरुण कृष्णनाथ आठल्ये यांचे शनिवारी, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी
अल्पशा आजाराने निधन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील ज्येष्ठ पत्रकार, माजी नौसैनिक आणि
समाजसेवक अरुण कृष्णनाथ आठल्ये यांचे शनिवारी, दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी
अल्पशा आजाराने निधन झाले.
प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक
नितीन बगाटे यांची देशातल्या पहिल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाली
आहे. त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या रेड्स या कृत्रिम बुद्धिमत्ता
तंत्रज्ञानावर आधारित ॲपचं सादरीकरण हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रीय पोलीस अकादमीत करण्यात आलं.
सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात
पुढच्या महिन्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम
राबवली जाणार आहे. बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांचा सायबर विमा
उतरवावा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोसी नदीला आलेल्या भयानक पुरामुळे
जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक किंवा
पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर नातेवाईकांनी माहिती देण्याचे आवाहन
करण्यात आले आहे.
रत्नागिरीतील कांचन डिजिटलतर्फे यंदाही घरगुती गणपती सजावट स्पर्धा
यंदाही आयोजित करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेत देखावा
(चलचित्र/स्थिरचित्र) आणि आकर्षक आरास असे दोन स्वतंत्र विभाग करून पारितोषिके
देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संगमेश्वरहून उमरे येथे जाणाऱ्या एसटी बसवर विद्युतवाहिनी तुटून
पडल्याची घटना आज, बुधवारी (२६ ऑगस्ट) सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने मोठी
जीवितहानी टळली.