पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह, कार्यक्षम होण्याकरिता कार्य करणार : अ‍ॅड. दीपक पटवर्धन

‘पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्याकरिता नियमांची काटेकोर अंमलबजावणी, संचालक मंडळाकडून डोळसपणे काम होणे आणि नेमक्या नोंदी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून राज्यभर राबवण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नवे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.

शिस्तबद्ध आणि स्वच्छ कारभारासाठी प्रसिद्ध असलेले ॲड. दीपक पटवर्धन राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष

राज्यातील सर्व पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे सुपुत्र आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची आज (१२ जून) बिनविरोध निवड झाली.

लांज्यातील काजू फॅक्टरीतील चोरीप्रकरणी दोघांना अटक; ९.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

लांज्यातील झिमण्स कॅश्यू पॉइंट या काजू फॅक्टरीत झालेल्या चोरीचा गुन्हा रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नैर्ऋत्य मान्सून तळकोकणात दाखल

नैर्ऋत्य मान्सून आज, सहा जून २०२६ रोजी महाराष्ट्रात – तळकोकणात दाखल

वडापाव, भजी, समोसा, भेळ… वर्तमानपत्रातून देण्यास बंदी! ‘एफएसएसएआय’चे निर्देश

तयार केलेले ताजे खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी किंवा खायला देण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर तातडीने बंद करावा, असे निर्देश भारतीय अन्नसुरक्षितता व मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) पश्चिम विभागाने दिले आहेत.

पीएम सूर्यघर योजनेत झळकले महाराष्ट्राचे तेज; मिळाले आठ पुरस्कार

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामगिरीसाठी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून महाराष्ट्राचा चार जून २०२६ रोजी गौरव करण्यात आला. विविध वर्गवारीमध्ये तब्बल आठ पुरस्कार राज्याला मिळाले