आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनातून वेगळा ठसा उमटवलेले संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक-नट पद्मश्री पं. प्रसाद सावकार यांचे आज (१७ जून २०२६) करंजाळे-पणजी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनातून वेगळा ठसा उमटवलेले संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक-नट पद्मश्री पं. प्रसाद सावकार यांचे आज (१७ जून २०२६) करंजाळे-पणजी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
तिसरी, चौथी आणि सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी सुकर व्हावी यासाठी आणि जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असला, तरी या सेतू अभ्यासक्रमाची दीडशे पानांहून अधिक मोठी असलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वतः छापून घ्यावी लागणार आहेत.
रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ हजार २७७ पिल्लांचा समावेश आहे.
दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (१५ जून) रत्नागिरीतील शाळा मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.
रत्नागिरीचे अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांनी आज (१४ जून) झालेली अत्यंत खडतर अशी दक्षिण आफ्रिकेतली ९० किलोमीटरची कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
‘पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम होण्याकरिता नियमांची काटेकोर अंमलबजावणी, संचालक मंडळाकडून डोळसपणे काम होणे आणि नेमक्या नोंदी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून राज्यभर राबवण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे नवे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.