रत्नागिरीत १६ ऑगस्टला ‘स्वरभास्कर’ बैठकीत चैतन्य, विशारद आणि नूपुर यांची मैफील

रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणे व उमद्या शास्त्रीय गायकांसाठी व्यासपीठ निर्माण करणे या उद्देशाने आर्ट सर्कल फाउंडेशन आणि सेंटर फॉर रिसर्च अँड प्रमोशन ऑफ इंडियन म्युझिक (CRPIM) यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत येत्या १६ ऑगस्ट रोजी विशेष स्वरभास्कर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

विलास रहाटे यांची ‘नाबार्ड’ कार्यालयातील रांगोळी लक्षवेधी

देवरूख : देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील नाबार्ड अर्थात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरली आहे.

‘पाण्याचे पंख’ ल्यालेल्या नितळ लेखणीची चिरविश्रांती! ‘डोह’कार श्रीवि कालवश!

शांत डोहातील पाण्यावर एखादे पान पडल्यामुळे हळुवार तरंग उमटावेत, त्याप्रमाणे त्यांचे लेखन वाचकाच्या मनाच्या डोहात वेगळ्या अनुभूतीचे तरंग तयार करते. त्याच वेळी मनाच्या तळाचा वेध घेण्याची ताकदही त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी मोजकेच, मात्र अद्वितीय असे लेखन केले. डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘डोह’कार श्रीवि म्हणूनच ते प्रसिद्ध झाले.

सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे खुली लेखन स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सलग नवव्या वर्षी खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सुंदर पत्र लिहा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशपातळीवरील सुंदर पत्राला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या दादागिरीवर कारवाईची मागणी

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील शेअरिंग रिक्षा स्टॉपवरून रिक्षाचालकांमध्ये वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. काही जुन्या रिक्षाचालकांकडून नवीन रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यास विरोध केला जात असून अरेरावी, शिवीगाळ व दादागिरी करून धमकावले जात आहे.