शांत डोहातील पाण्यावर एखादे पान पडल्यामुळे हळुवार तरंग उमटावेत, त्याप्रमाणे त्यांचे लेखन वाचकाच्या मनाच्या डोहात वेगळ्या अनुभूतीचे तरंग तयार करते. त्याच वेळी मनाच्या तळाचा वेध घेण्याची ताकदही त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी मोजकेच, मात्र अद्वितीय असे लेखन केले. डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘डोह’कार श्रीवि म्हणूनच ते प्रसिद्ध झाले.