रत्नागिरीत ५१ किलो गोवंश मांसासह एकाला अटक

अवैधरीत्या गोवंश मांस बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका व्यक्तीला अटक केली.

‘टीईटी’चा पेपर फुटला; दीड कोटीत होणार होता सौदा! दिल्लीतून आणले पेपर; आरोपींना अटक

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी २०२६ ही परीक्षा २८ जून २०२६ रोजी होणार होती. त्याच्या एक दिवस आधीच पेपरफुटीचा मोठा प्रकार भिवंडीत उघडकीस आला आहे. पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे.

‘अनबॉक्स’कडून वर्धापनदिनानिमित्त पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट

रत्नागिरीतील ‘अनबॉक्स युअर डिझायर’ या फूड डिलिव्हरी उद्योगाचा सहावा वर्धापनदिन नुकताच झाला. त्या निमित्ताने, ‘अनबॉक्स’तर्फे रत्नागिरी पोलीस दलाला सीसीटीव्ही यंत्रणा भेट देण्यात आली.

आणीबाणीविरोधातील आंदोलन म्हणजे देशासाठी केलेला त्याग : खासदार नारायण राणेंनी केला सत्याग्रहींचा सन्मान

अशा त्यागी व्यक्तींचा सन्मान माझ्या हस्ते होणं हे मी माझं भाग्य समजतो. हा कृतज्ञतेच्या भावनेतून केलेला सन्मान आहे,’ असं प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केलं. संविधान हत्या दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीत आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी पाच लाखांच्या भरपाईची आंबा उत्पादकांची मागणी

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक निदर्शने करून धरणे धरण्यात आले.

रत्नागिरीतील सहा जणांना शासनाचे कृषी पुरस्कार; एक जुलै रोजी होणार सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने २०२३ या २०२४ वर्षांचे विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.