मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारविजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. विविध श्रेणींमध्ये कोकण विभागातील पाच जणांना यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचा विकास महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कार्यरत असलेल्या अभ्यंकर कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव थाटात साजरा होणार असल्याची माहिती कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी दिली.
‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याने कोकणवासीयांना अंतर्मुख केले आहे. समर्थ कृपा प्रॉडक्शननिर्मित या लोकनाट्याचा ६००वा प्रयोग २३ एप्रिल २०२६ रोजी संगमेश्वरमधील गणेशआळी येथे रंगणार आहे.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेदिनी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
रत्नागिरी : कुवारबाव येथील श्री महालक्ष्मी मंडळ मैदानावर आयोजित विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी परिसरातील हजारो हिंदू बंधू-भगिनींच्या उपस्थितीमुळे संमेलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.