दापोली : आजच्या (दि. २१ सप्टेंबर) गौरी आगमनदिनी दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिकांनी आतगाव रोडवरील पारंपरिक पाणवठ्यावर तेरडा वनस्पतीचे गौरीस्वरूप आवाहन केले आणि गौराईच्या आगमनाप्रीत्यर्थ वाजत-गाजत मिरवणूक काढली.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
दापोली : आजच्या (दि. २१ सप्टेंबर) गौरी आगमनदिनी दापोली तालुक्यातील केळशी पंचक्रोशीतील सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिकांनी आतगाव रोडवरील पारंपरिक पाणवठ्यावर तेरडा वनस्पतीचे गौरीस्वरूप आवाहन केले आणि गौराईच्या आगमनाप्रीत्यर्थ वाजत-गाजत मिरवणूक काढली.
खेड : हेदली (ता. खेड) येथील गोवळकर कुटुंबायांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करून गणरायाला समतेची आरती गाऊन निरोप दिला.
कोकणात गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून चाकरमानी गावी पोहोचतात. त्यासाठी वेगवेगळ्या वाहनांची निवड केली जाते. दापोली सायकलिंग क्लबच्या चौघा सदस्यांनी सायकलची निवड केली. आंबवली गावातील सूरज भुवड आणि किरण भुवड, लाडघर येथील अजय मोरे आणि कोळथरे गावातील यश भुवड नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्याला असतात. तेथून ते गणेशोत्सवासाठी गावी पोहोचले. हा २५० किमीचा सायकल प्रवास यश आणि किरण या दोघांनी १६ सप्टेंबर २०२३ रोजी आणि अजय आणि सूरज यांनी १९ सप्टेंबर रोजी एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग मुंबई अंधेरी, पनवेल, कोलाड, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. सकाळी ४ वाजता अंधेरीहून सुरू झालेला सायकल प्रवास रात्री ११ वाजता दापोली येथे संपला.
या सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पागोष्टी झाल्या. पर्यावरणपूरक गणपती उत्सवाचा संदेश घेऊन निघालेल्या या चौघांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या. त्यामुळे सर्व शीण काही क्षणातच नाहीसा झाला आणि आणखी स्फूर्ती मिळाली, असे त्यांनी सांगितले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात हे चौघेजण सायकलचा वापर अधिक प्रमाणात करतात. ऑफिस आणि बाजारात जाण्यासाठी ते अनेक वेळा सायकलचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहिले आहे. अनेक वर्षांपासून ते आजारी पडलेले नाहीत. गणपती बाप्पाची कृपा आणि सर्वांच्या सदिच्छा यामुळेच हा सायकल प्रवास यशस्वी सुखरूप झाला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सर्वांनी तंदुरुस्त आरोग्यासाठी सायकल चालवावी, असे त्यांनी आवाहन केले आहे.
रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील आगळ्या देखाव्याचे वेगळेपण सलग पंधराव्या वर्षीही जपले असून यावर्षी त्यांनी इको-फ्रेंडली देखाव्यातून भारतीय सेनेला मानवंदना दिली आहे.
रत्नागिरी : तुरळ (ता. संगमेश्वर) येथील रस्टिक आर्ट्सने रत्नागिरीत भरविलेल्या कलात्मक लाकडी वस्तूंच्या तीन दिवसांच्या प्रदर्शनात प्रामुख्याने खुर्च्या, टेबल अशा लाकडी वस्तूंना अधिक मागणी होती, अशी माहिती रस्टिक आर्ट्सच्या सौ. शिल्पा नितीन करकरे यांनी दिली.
रत्नागिरी : पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रांची सांगड घालणाऱ्या अनोख्या अशा धावनगरी रत्नागिरी कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन येत्या ७ जानेवारीला रत्नागिरीत करण्यात आले आहे.