‘पाण्याचे पंख’ ल्यालेल्या नितळ लेखणीची चिरविश्रांती! ‘डोह’कार श्रीवि कालवश!

शांत डोहातील पाण्यावर एखादे पान पडल्यामुळे हळुवार तरंग उमटावेत, त्याप्रमाणे त्यांचे लेखन वाचकाच्या मनाच्या डोहात वेगळ्या अनुभूतीचे तरंग तयार करते. त्याच वेळी मनाच्या तळाचा वेध घेण्याची ताकदही त्यांच्या लेखणीत होती. त्यांनी मोजकेच, मात्र अद्वितीय असे लेखन केले. डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘डोह’कार श्रीवि म्हणूनच ते प्रसिद्ध झाले.

सद्गुरू लोकमान्य वाचनालयातर्फे खुली लेखन स्पर्धा

देवरूख : येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाचे माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सलग नवव्या वर्षी खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सुंदर पत्र लिहा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशपातळीवरील सुंदर पत्राला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

रत्नागिरी रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षाचालकांच्या दादागिरीवर कारवाईची मागणी

रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील शेअरिंग रिक्षा स्टॉपवरून रिक्षाचालकांमध्ये वाद वाढत असल्याचे समोर आले आहे. काही जुन्या रिक्षाचालकांकडून नवीन रिक्षाचालकांना रिक्षा उभी करण्यास विरोध केला जात असून अरेरावी, शिवीगाळ व दादागिरी करून धमकावले जात आहे.

रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे उपपरिसरात रूपांतर व्हावे – कुलगुरू डॉ. अतुल वैद्य

रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे, अशी अपेक्षा कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले.

सरकार आणणार नवा लँड टायटलिंग कायदा : महसूलमंत्री बावनकुळे यांची रत्नागिरीत घोषणा

जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार डिसेंबरच्या अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार आहे. ‘आधी मोजणी, त्यानंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार’ हे त्याचं तत्त्व असेल. तसंच, कूळ, वहिवाटदार आणि देवस्थानांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी देवस्थान जमीन इनाम कायदाही लवकरच आणला जाईल, अशी घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज रत्नागिरीत केली.