कणकवली : येथे राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी श्यामची आई तर प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होत? हे पुस्तक भेट दिले.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
कणकवली : येथे राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी श्यामची आई तर प्रमुख अतिथींना शिवाजी कोण होत? हे पुस्तक भेट दिले.
गेली दोन वर्षं शारीरिक इम्युनिटी अर्थात प्रतिकारशक्तीवर जगभर प्रचंड चर्चा होते आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे विचार मांडले होते, त्यातून त्यांनी देशबांधव आणि भगिनींच्या शारीरिक, मानसिक इम्युनिटीसह देशाच्या सामाजिक आणि आर्थिक इम्युनिटीचाही विचार केला होता, हे जाणवतं. रत्नागिरी ही सावरकरांची कर्मभूमी. त्यांच्या रत्नागिरी प्रवेशाला २०२१मध्ये १०० वर्षं पूर्ण झाली. २८ मे रोजी सावरकरांची जयंती आहे. तसंच, सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू आहे. या औचित्याने, सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणारी ही लेखमाला… आजचा पहिला भाग सामाजिक इम्युनिटीबद्दलचा…
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या गंगेचे अवघ्या तीनच महिन्यांत पुनरागमन झाले आहे. उन्हाळे या तीर्थक्षेत्री १५ मे २०२२ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती संस्थानचे सचिव श्रीकांत घुगरे यांनी दिली.
रत्नागिरी : आद्य शंकराचार्यविरचित शिवपंचाक्षर स्तोत्र, नर्मदाष्टक, जागन्नाथाष्टक, भवान्याष्टक, कृष्णाष्टक आणि देव्यापराधक्षमापन स्तोत्र सादर करत आद्य शंकराचार्यांचा जीवनक्रम उलगडणारा सुरेल कार्यक्रम चिपळूणच्या कात्यायनी स्तोत्र पठण मंडळाने सादर केला.
राजापूर : माजी खासदार नीलेश राणे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त झाली आहे.
उद्धर (जि. रायगड) येथील तुषार केळकर यांनी ४ जून ते २६ जून या कालावधीत गोधडी शिवण्याच्या आगळ्यावेगळ्या सशुल्क कार्यशाळेचे आयोजन केले आहे.