मंडणगडमध्ये २११.२५ मिमी पाऊस; आज मुंबई आणि रायगडातही जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारच्या अल्पशा विश्रांतीनंतर रविवारचा पूर्ण दिवस पुन्हा एकदा पावसाचा होता. मुंबईत आज (२६ मे) मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून, अंधार दाटून आला आहे. रायगड जिल्ह्यात (२६ मे) मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

संगमेश्वरातील वीजपुरवठा उद्या दुपारी सुरू होणार

संगमेश्वरजवळ महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असताना माती उकरल्यामुळे आज (२१ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास वडाचं झाड कोसळलं आणि कसबा उच्चदाब वीजवाहिनीचे सहा खांब वाकले.

मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपलं; जनजीवन विस्कळीत; वीज पडल्यामुळे नुकसान

मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला काल (२० मे) अक्षरशः झोडपून काढलं. विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वाऱ्यांसह पडलेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर अशा जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मोठा पाऊस झाला.

राजापूरसह तालुक्यातील पाऊस आणि पूरस्थिती कायम

राजापूर : राजापूर शहरातून अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा शहराला पडलेला वेढा काहीसा सैल झाला असला, तरी अद्यापही पूरस्थिती कायम आहे.