आर्थिक उन्नती हेच आरक्षणाच्या मागणीचे प्रमुख उद्दिष्ट असेल तर श्रमांना प्रतिष्ठा देण्यासाठी याच नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यातून आरक्षणाचा मूळ मुद्दाच नाहीसा होऊ शकेल. पण याची सुरुवात कोणी करायची, हाच खरा प्रश्न आहे. तो सर्वच नेत्यांनी सोडविला तरच मार्ग निघणार आहे.