शेतीच्या सर्व समस्यांवर उपाय ठरेल अशा बांबूची लागवड कोकणात फायद्याची; लवकरच राज्याचे पहिले बांबू धोरण

‘आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडते. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरून, अख्ख्या गावाला घेऊन काम केले, तर सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.