‘मधुमेहामुळे जगभरात सध्या दर अर्ध्या मिनिटाला एका व्यक्तीचा पाय कापावा लागतो. योग्य वेळी तपासणी न केल्यामुळे आणि उपचार न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे; मात्र मधुमेही व्यक्तींनी शरीरातील अन्य महत्त्वाच्या अवयवांबरोबरच पायांच्या आरोग्याबद्दलही दक्ष राहून नियमित तपासणी करून वेळीच उपचार घेतल्यास यातील ८० टक्के जणांचे पाय वाचवणे शक्य आहे,’ असे प्रतिपादन ठाण्यातील प्रथितयश मधुमेहतज्ज्ञ (डायबेटॉलॉजिस्ट) डॉ. आशिष सरवटे यांनी केले.