रत्नागिरी : येत्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरिता मध्य रेल्वेतर्फे १५६ गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये संपूर्ण अनारक्षित गाडीचाही समावेश आहे. अनारक्षित गाडी वगळता अन्य सर्व गाड्यांचे विशेष शुल्कासह आरक्षण २७ जूनपासून सुरू होणार आहे.