Advertisements
करोना विषाणूवर कोणतीही लस नसल्याने, तो होऊ नये म्हणून काळजी घेणे हेच आपल्या हाती आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. रोग होऊ नये म्हणून जीवनशैलीच आरोग्यपूर्ण असण्यावर आयुर्वेदाचा भर आहे. सध्याच्या परिस्थितीत ही जीवनशैली अंगीकारावी, अशी शिफारस केंद्रीय आयुष मंत्रालयाने केली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मंत्रालयाने काही आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल. नागरिकांनी ही जीवनशैली अंगीकारल्यास नक्की उपयोग होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वानुभवावरून सांगितले आहे.

