रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील अस्मिता महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. सविस्तर निकाल वाचा…
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील अस्मिता महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. सविस्तर निकाल वाचा…
साप्ताहिक कोकण मीडियाने यंदाचा (२०२१) दिवाळी अंक इम्युनिटी या विषयावर काढला आहे. त्या अंकाचे अंतरंग येथे उलगडून दाखवले आहेत. इम्युनिटी या विषयावरचे विविध तज्ज्ञांचे लेख, वैचारिक लेख, इम्युनिटी विशेष व्हिडिओ मालिका, तसंच इम्युनिटी या विषयावर घेतलेल्या कथा स्पर्धेतल्या विजेत्या कथा, अन्य कथा, कविता, व्यंगचित्रं अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी या अंकात आहे. त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.
धन्वन्तरी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा तपशील
गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील काळात भविष्यकाळातील संभाव्य महामारींचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने घ्याव्या लागणाऱ्या जबाबदारीबाबत काही सुचविण्याचा हा एक प्रयत्न.
योग दिवस संपूर्ण जगात लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र सरकारने २०१६पासून दर वर्षी येणाऱ्या दीपावलीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे यंदा आज (१३ नोव्हेंबर २०२०) हा दिवस साजरा होत आहे. भगवान धन्वंतरी हे आरोग्यशास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. आरोग्यसंवर्धन होण्यासाठी म्हणून धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. Ayurveda for COVID19 Pandemic अर्थात ‘करोनासाठी आयुर्वेद’ हे यंदाच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे घोषवाक्य आहे.
रत्नागिरी : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या आणि वाढण्याची शक्यता असल्याच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा उपाय सांगितला जात आहे. ही रोगप्रतिकारशक्ती किती आहे, याचे मापन करणारे केंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे. करोनाच्या काळात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.