धन्वन्तरी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, सावंतवाडी

धन्वन्तरी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा तपशील

करोनाचा धडा : प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मूलभूत गोष्टी अंगीकारू या!

गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील काळात भविष्यकाळातील संभाव्य महामारींचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने घ्याव्या लागणाऱ्या जबाबदारीबाबत काही सुचविण्याचा हा एक प्रयत्न.

करोना आणि आयुर्वेदीय उपचार संहिता

योग दिवस संपूर्ण जगात लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र सरकारने २०१६पासून दर वर्षी येणाऱ्या दीपावलीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे यंदा आज (१३ नोव्हेंबर २०२०) हा दिवस साजरा होत आहे. भगवान धन्वंतरी हे आरोग्यशास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. आरोग्यसंवर्धन होण्यासाठी म्हणून धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. Ayurveda for COVID19 Pandemic अर्थात ‘करोनासाठी आयुर्वेद’ हे यंदाच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे घोषवाक्य आहे.

क्वारंटाइन ते मृत्यू… घरात अनुभवलेला करोना!

बाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले आजी-आजोबा, उपचार सुरू असताना आजोबांचा झालेला मृत्यू, वडील करोनाबाधित झाले नाहीत, तरी त्यांना क्वारंटाइन व्हावं लागणं, त्यातच आईबरोबरच स्वतःलाही करोनाची लागण होणं…. सरकारी रुग्णालयात आलेला अत्यंत चांगला अनुभव… आयुर्वेदशास्त्राच्या विद्यार्थ्याने स्वतःच्या घरात अनुभवलेल्या करोनाबद्दलचा हा लेख…

रसौषधींच्या ज्ञानाचा अर्क : वैद्य‌ रघुवीर भिडे

वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे आज (२७ जुलै) निधन झाले. सावंतवाडीतील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा श्रद्धांजलीपर लेख….

कोविड-१९च्या अनिवार्य ट्रेनिंगसाठी आयुष डॉक्टर्सना अपुरी मुदत अन्याय्य

मुंबई येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या संस्थेकडून आयुष डॉक्टरांसाठी कोविड-१९ संदर्भातील ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टर्सनी ११ एप्रिलपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र तशी कल्पना त्यांना केवळ दोन दिवस आधी देण्यात आली आहे. खेड्यापाड्यांत काम करणाऱ्या डॉक्टर्सना कनेक्टिव्हिटीचा मोठा प्रश्न भेडसावतो. त्यातच प्रशिक्षण न घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हे अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे.