दिवा का लावायचा? आयुर्वेदातील विज्ञान काय सांगते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिलला नऊ वाजता दीपप्रज्ज्वलन करायला सांगितले आहे, त्यावर अनेकांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी सांगितलेल्या गोष्टीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन काय असावा, याविषयी जाणून घेण्यासाठी *लांजा येथील चैतन्य घाटे या BAMSच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने* मुंबईतील *वैद्य अरुण मिश्रा* यांच्याशी संपर्क साधला. आयुर्वेदातील व्याधीविचार किती व्यापक असतो आणि त्यावर असे उपाय कशा प्रकारे कार्य करू शकतात, याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कोरोना महामारीचा प्रतिकार आणि प्रतिबंध : आयुर्वेद काय सांगतो?

कोरोना विषाणूच्या संसर्गाने सध्या सारे जग व्यापले आहे. या पार्श्वभूमीवर, या महामारीच्या प्रतिबंधासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदातील उपाययोजनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. सावंतवाडी येथील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी याविषयी केलेले हे मार्गदर्शन…

रोगप्रतिकारशक्ती वाढवा; आयुष मंत्रालयाने सुचवली आयुर्वेदीय जीवनशैली

करोना विषाणूवर कोणतीही लस नसल्याने, तो होऊ नये म्हणून काळजी घेणे हेच आपल्या हाती आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. रोग होऊ नये म्हणून जीवनशैलीच आरोग्यपूर्ण असण्यावर आयुर्वेदाचा भर आहे. सध्याच्या परिस्थितीत ही जीवनशैली अंगीकारावी, अशी शिफारस केंद्रीय आयुष मंत्रालयाने केली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मंत्रालयाने काही आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल. नागरिकांनी ही जीवनशैली अंगीकारल्यास नक्की उपयोग होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वानुभवावरून सांगितले आहे.