रत्नागिरी : आजवर मुंबईकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर कोकणातील चुली पेटत होत्या. मात्र करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या चाकरमान्यांच्या मुंबईतील चुली पेटण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. गावातच धान्य गोळा केले आणि ते चाकरमान्यांना मुंबईत घरपोच दिलेही.
