मुंबई : करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तीन ३ महिने मुंबईत अपुऱ्या जागेत राहावे लागलेल्या चाकरमान्यांची घुसमट आता वाढली आहे. रीतसर परवानगी घेऊन कोकणात येऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांची मोठी निराशा झाली आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
