‘चिरंजीव असलेले जयवंत दळवींचे साहित्य कधीही कालबाह्य होणारे नसल्याने त्यांचे साहित्य हीच त्यांची खरी संजीवन समाधी आहे,’ असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष तथा नामवंत वक्ते प्राचार्य अनिल सामंत यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात बोलताना केले.