कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरू असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सावादरम्यान मठातील सुमारे पन्नास गाईंचा अचानक मृत्यू झाला. कालपासून या घटनेला सुरवात झाली. गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात असून ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचा खुलासा श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने केला आहे.